किनवट, दि.१३ : दिव्यांग व्यक्तींच्या कल्याणासाठी स्थानिक स्वराज्य संस्थांनी राखीव ठेवलेला ५ टक्के निधी आर्थिक वर्ष २०२५–२६ समाप्त होण्यापूर्वी पात्र लाभार्थ्यांना वितरित करावा, अशी मागणी सेक्युलर दिव्यांग मुव्हमेंटचे नांदेड जिल्हा अध्यक्ष ॲड. मिलिंद सर्पे व सचिव दिलिप पाटील यांनी नुकतीच केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगर परिषद किनवटच्या नगराध्यक्षा सुजाता विनोद येंड्रलवार तसेच पंचायत समिती किनवटच्या गटविकास अधिकारी यांना निवेदन दिले आहे.
Tags
||जिल्हा||
