किनवट, दि.२९ : “कवितेतून मानवतेचे चिंतन व्हावे, संवेदनांना जाग यावी; वास्तवाचे बी पेरून प्रबोधन व्हावे” असे स्पष्ट मत प्रसिद्ध कवी अनंत विठ्ठल राऊत यांनी व्यक्त केले. साने गुरुजी जयंती व साने गुरुजी रुग्णालयाच्या तिसाव्या वर्धापन दिनानिमित्त तसेच साने गुरुजी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या लोकार्पणाचे औचित्य साधून आयोजित भव्य कवी संमेलनात ते बोलत होते.कार्यक्रमाच्या प्रारंभी साने गुरुजी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. गुलाबी थंडीत रंगलेल्या साहित्यसोहळ्याला काव्यमय गारवा लाभला. विचारमंचावर कवी प्रकाश घोडके (अध्यक्ष), प्रभाकर साळेगावकर, भारत सातपुते आणि डॉ. विनायक पवार आदी मान्यवर उपस्थित होते.
Tags
||महाराष्ट||
